ठाणे - कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही, असा दुष्पप्रचार करीत काही हिंदूत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित रहावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरविणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली.
मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र, मुस्लीम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये, असे म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता. तसेच, अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केले होते.
मुंब्रा येथील डायमंड हाॅलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेहंदी सेमिनारमध्ये शेकडो हिंदू- मुस्लीम महिला सहभागी झाल्या होत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लीम तरूणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला.
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, हा देश गंगा-जमुनी तहजीब पाळणारा आहे. या देशात सामाजिक एकोपा असावा, अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई; सब है भाई-भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे, असे सांगितले--- .छाया, मनोज सिंह
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, हा देश गंगा-जमुनी तहजीब पाळणारा आहे. या देशात सामाजिक एकोपा असावा, अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई; सब है भाई-भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे, असे सांगितले--- .छाया, मनोज सिंह





No comments:
Post a Comment